🎯निवडणुका आणि मिशन स्वराज
सध्या महाराष्ट्रामध्ये
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच वातावरण चांगलचं तापलेलं दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांचा
प्रचार खूप जोरात सुरू आहे. गावागावात गल्लीबोळ्यांमध्ये निवडणुकांच्या चर्चांना उधाण आलेलं
आहे. राजकीय
पक्षांनी आपापले जाहीरनामे देखील प्रसिद्ध केलेले आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनता आकर्षित होईल अशा अनेक
योजनांचा समावेश राजकीय पक्षांकडून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केला जात आहे. परंतु या सर्व योजनांमुळे
खरंच सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल का ? त्यांना सन्मानाने जगता येईल का ? .. हे पाहणे गरजेचे आहे.
🎯छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य
हे लोककल्याणकारी राज्य या संकल्पनेवर आधारित होतं. लोककल्याणकारी
राज्यांमध्ये जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात तसेच स्त्रियांचा आदर सन्मान केला
जातो. सामान्य
जनतेची,
शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. कोणावरही अन्याय होत नाही. शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास होतो. लोककला नावारूपाला येतात. जनता सुख समाधानाने राहते. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे खऱ्या
अर्थाने जनतेचं राज्य होतं.
🎯ध्रुव राठी यांच्या मिशन स्वराज्य विषयी
जगप्रसिद्ध Youtuber ध्रुव राठींनी नुकताच एक व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनलवर शेअर
केला आहे. या
व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मिशन स्वराज्य ही संकल्पना मांडली आहे. त्याचबरोबर त्यांनी
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना एक आव्हान दिलेलं आहे. जे कोणी हे मिशन स्वराज्य आव्हान स्वीकारेल त्यांना सपोर्ट
केला जाईल, अशी
भूमिका त्यांनी मांडली आहे. ध्रुवराठी यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंकचा वापर
करू शकता.
मिशन स्वराज्य ⇒ ध्रुव राठी यांनी मांडलेल्या मिशन स्वराज्य या संकल्पनेमध्ये खालील मुद्द्यांवर राजकीय पक्षांनी काम करणे अपेक्षित आहे.
🎯शेतकऱ्यांना सहाय्य (Farmer's Assistance)
शेतकऱ्यांना सन्मानाने जगता
येण्यासाठी त्यांचे शेती
उत्पादन वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक
शेतकऱ्याला प्रशिक्षण दिले जावे, त्यांना माती परीक्षण कसे करावे याबद्दल माहिती मिळावी, त्यांना शेतमालासाठी लोकल मार्केट उपलब्ध व्हावी.. अशा अनेक मुद्द्यांवर काम करणे गरजेचे आहे.
🎯रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rainwater Harvesting)
पावसाळ्यात पडणाऱ्या
पावसाच्या पाण्याची साठवण करून टंचाईच्या काळात त्या पाण्याचा पुनर्वापर करणे
म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. यामध्ये पावसाचे पाणी छतासारख्या पृष्ठभागावरून गोळा केले जाते आणि टाकी,खोल खड्डा, पाझर असलेल्या जलाशयाकडे पुनर्निर्देशित केले जाते. त्यामुळे भूजल पुनर्संचयित होण्यास मदत होते. दुष्काळी परिस्थितीवर मात
करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग खरंच खूप उपयुक्त आहे.
🎯मोफत दर्जेदार शिक्षण (Free Quality Education)
सर्व विद्यार्थ्यांना मोफत
आणि दर्जेदार शिक्षण
मिळणे हा त्यांचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळाले तर त्यातून चांगले भारतीय
नागरिक निर्माण होतील आणि पर्यायाने आपल्या भारताची प्रगती होईल. भारताला जर महासत्ता व्हायचे असेल तर त्यासाठी सुजाण भारतीय
नागरिकांचे निर्मिती व्हायला हवी. यासाठी विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणे खूप
आवश्यक आहे.
🎯मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा (Free Quality Healthcare)
आज दुर्धर आजारांसाठी आरोग्यावर होणारा खर्च हा
सर्वांसामान्य नागरिकांसाठी न परवडणारा आहे. आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे त्यांची आर्थिक
परिस्थिती सुधारण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि दर्जेदार
आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत.
🎯स्वच्छता आणि सुरक्षित हवा (Cleanliness And Fresh Air)
आज प्रदूषणाचे प्रमाण खूप
वाढलेले आहे.
प्रदूषणामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे. यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रदूषणावर
नियंत्रण ठेवणे व हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.
🎯सुरक्षा (Safety And Security)
आज आपण बघतो की आजूबाजूला गुन्हेगारीचे प्रमाण
वाढलेले आहे.
स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नागरिकांना निर्भयपणे जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सुरक्षिततेवर भर देणे
गरजेचे आहे. त्यासाठी
योग्य त्या उपाययोजना करायला पाहिजेत.
🎯स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन (Promote Local MSME's)
आज बेरोजगारीची समस्या खूप
मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी
स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे जेणेकरून लोकांना रोजगार उपलब्ध
होईल. त्यांची
प्रगती होईल.
पर्यायाने आपल्या महाराष्ट्राची व आपल्या देशाची प्रगती होईल.
🎯यामुळे नक्की काय होईल ?
- वरील मुद्द्यांवर जर राजकीय
पक्षांनी काम केले तर नक्कीच लोकांच्या जीवनमानात बदल होईल.
- नागरिक/जनता समाधानी होण्यास मदत होईल.
- समाधानी नागरिक हे राष्ट्र हितामध्ये त्यांचे भरीव योगदान देऊ शकतील.
- आपल्या महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि हीच खरी छत्रपती शिवरायांना मानवंदना ठरेल.
Tags
ChangingLife